रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील नवतरुण मंडळातर्फे १० ते १५ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी सात वाजता पूजा, सायंकाळी ७.३० वाजता महाआरती, रात्री नऊ वाजता भजन आणि १० वाजता दांडिया असे कार्यक्रम होणार आहेत.
‘जयगड परिसरातील नागरिकांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मंगेश साळवी, उपाध्यक्ष विश्वास धुंदूर, सचिव ऋषीराज धुंदूर आणि खजिनदार राजेश केदारी यांनी केले आहे.
उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सभासद अनिरुद्ध साळवी, अनिल कांबळे, लक्ष्मीकांत सोनार, देविदास हळदणकर, नारायण काताळकर, संतोष पाडाळकर, सचिन भोपळे, नागेश झगडे, शर्मिला साळवी मेहनत घेत आहेत.